Skip to main content

मराठवड्यातले रावसाहेब...



फारसा कृष्ण नसला तरी सावळा रंग. चेहऱ्यावर स्मित आणि दिलखुलास राजकारणी असल्याचं दर्शवणार बोलणं. जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यात जवखडा नावाचं ह्यांच गाव. राजकारणात जेव्हा पाटील साहेब येत होते तेव्हा चारशे वस्ती असलेलं. त्यात 'ह्यांच्याच' गोतावळा 60 जणांचा. पण राजकारणात यायची इच्छा आणि घरात जनसंघाची विचारधारा ह्यातून तयार झालेले रावसाहेब.


खरं पाहता 'रावसाहेब' हा शब्द मी ह्याधी पहिला आणि शेवटचा पु.लंच्या व्यक्तिचित्रणात ऐकला होता. पण त्या सदैव 'तिखट' आणि ह्या 'कधीतरी तापट' असणाऱ्या रावसाहेबांमध्ये बराच फरक जाणवला. पाटील साहेबांची मला सगळ्यात रुचलेली गोष्ट म्हणजे- त्यांनी आपल्या गावची भाषा सोडलेली नाही. परुळेकर सरांनी ST एकदा तरी गावात यायची काअस विचारल्यावर साध्या आणि मिश्किल भाषेत पाटील साहेब उत्तरले-"आमच्या गावच्या मारुतीन एसटीच बगीतली नव्हती". तितक्याच मिश्कीलपणे ते पंचायत सभापती झाले असताना त्यांच्या मित्रांना बसत नव्हता आणि त्यांनी ते कसं पटवून दिलं हे ही सांगितलंय.


पण हा गावचा हेल जितका शाबित ठेवलाय तितकाच हा माणूस प्रसारमाध्यम आणि तत्सम social media ला जास्त बधलेलाही वाटत नाही आणि रुळलेला ही नाही. त्या कुर्त्यावरच्या ओव्हरकोट मधल माईक सारख सावरतायत, असं मला उगीच त्यांच्या हावभाव बघून वाटत होतं. पण ह्या मीडिया पेक्षा मला माझा कार्यकर्ता महत्वाचा आणि हे सगळं दिव्य मला मुंबईत आल्यावर कळलं, ह्या दोन्ही वाक्यात conviction आणि candidness, दोन्ही वाटत होता.



मुंडे साहेब आणि प्रमोद महाजनजी हे माझ्याहून अनुक्रमे 5 आणि 10 वर्षांनी मोठे. भाजपचा 20-22 वर्षाचा तरुण काँग्रेसबहुल भागातून निवडून आल्यावर दोघांनी त्यांची भेट घेतली आणि नंतर प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, रावसाहेब पाटील दानवे आणि जयसिंगराव गायकवाड ह्यांची एक फळी कशी तयार झाली हे ही सांगितलं.


1985-90 आणि तदनंतर 1990-95 च्या राजकारणामधली स्थित्यंतर, पैशाचं राजकारण, कार्यकर्त्यांबद्दल अनास्था ह्याचा आलेख सांगितला. त्याचबरोबर आपल्या 37 वर्षांच्या कारकिर्दीत तीन पिढ्या अनुभवल्याचंही सांगितलं. दिल्ली मधल्या धोब्याचा पोरग्या नंतर MCD election ला उभा राहतो, तोच पैसे आणि नावाच्या जोरावर राजकारण करणारे तत्सम celebrity टिकाव धरत नाहीत, हे ही नमूद केले.


बदलत्या राजकारणासोबत आणि एकंदर परिस्थिती सोबत बदल हवा असतो हे ही सांगितलं. पण फारश्या झोतात न आलेल्या, क्वचित कधी आपल्या वक्तव्यांवरून टीकाही सहन केलेल्या, सध्या महाराष्ट्र भाजपचे अध्यक्षपद भूषवित असणारे रावसाहेब दानवे-पाटील, हे मुलाखत बघितल्यानंतर तरी एक मुरलेले राजकारणी संभवतात!!

(मी शब्द तसे जपून वापरतोय, ह्याचा विपर्यास कृपया करू नये!! सोबत मुलाखतीची विडिओ लिंक दिलीय.)

राजू परुळेकरांनी घेतलेली रावसाहेब-पाटील दानवे यांची मुलाखत

Comments

Popular posts from this blog

Proof of Work: Scriptwriting for Sushant Ghadge.

 Links to the videos that I have worked on with proof of work: I will keep optimizing how the blog is displayed with time. Till then, click on the images to view the respective episode. It is in Marathi. Wrote comedy based script for the creator. Socials: Instagram , Twitter .

दिव्य मराठी मधील माझा लेख - दि. ४ डिसेंबर २०२२

'मी' मराठी भाषेसाठी काय करतोय?!

हा प्रश्न वाचून हा निखिल वागळेंच्या आजचा सवाल मधला कौल वाटला असेल कदाचित. पण हा खरोखर महत्वाचा प्रश्न आहे. परवा जागतिक मराठी अकादमी संयोजीत राज ठाकरे आणि शरद पावरांमध्ये एक परिसंवाद घडवून आणला होता. त्यात मराठीला अनुसरून अनेक मुद्दे उपस्थित केले होते. राज ठाकरे प्रातिनिधिकहुनही अधिक स्वरूपात मराठी साठी काम करत असतील, नसतील. पण मूळ मुद्दा असाय की आपण मराठीसाठी काय करतोय? मराठीचा केवळ प्रतिकात्मक पुरस्कार करून काई फरक पडू शकतो का? तर त्याचं उत्तर होय असं आहे. पण ते काई काळासाठी. कालांतराने त्यात विस्मृती येत जाईल. बरंच काई करण्यासारखं आहे. मराठी राजभाषा दिन म्हणजे कुसुमाग्रज म्हणजेच वि.वा. शिरवाडकर यांची जयंती. मराठीबद्दल कुठलाही दिखाऊ अभिमान आणि इतर भाषेचा द्वेष न बाळगता आपण भाषेची वाढ कशी शकतो ते पाहणं महत्वाचं ठरतं. कुसुमाग्रजांच्या स्वातंत्र्यदेवतेची विनवणीत मराठीबद्दल, मराठी भाषेच्या वृद्धिबद्दल भाष्य केले आहे: परभाषेतही व्हा पारंगत ज्ञानसाधना करा तरी माय मराठी मरते मरते इकडे परकीचे पद चेपू नका भाषा मरता देश ही मरतो गुलाम भाषिक होऊनि आपल्या प्रगतीचे शीर कापू नका! ...